Posts

अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज

Image
अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज   वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, कलात्मक वस्तु खरेदीची संधी परभणी, दि. 17 (टिळक रत्न प्रतीनिधी ) :  ‘ अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 28 व 29 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती साहित्य, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने एकाच ठिकाणी म...

महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड

Image
महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड  परभणी,दि.16(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.          राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेशराव वरपुडकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.          दरम्यान, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी शेषराव भरोसे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला. यावेळी गटनेत्या तिरुमला खिल्लारे, मोकींद खिल्लारे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.         दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत परभणी शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले.

उद्या पासून 3 दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज

Image
 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे* मुंबई, दि. 16 मार्च (टिळक रत्न प्रतिनिधि) : दि. 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्या...

प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा

Image
 परभणी  प्रशासकीय इमारत परिसरात आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार; वाहनांच्या गर्दीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडथळा परभणी | टिळक रत्न प्रतिनिधी :-  परभणी शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात मागील वर्षापर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यरत होते. सध्या आरटीओ कार्यालय असोला येथे स्थलांतरित करण्यात आले असले तरी, आरटीओ एजंटांचा मनमानी कारभार मात्र अद्याप प्रशासकीय इमारत परिसरात सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. आरटीओ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतरही पासिंगसाठी येणारी वाहने एजंटांकडून प्रशासकीय इमारतीच्या मैदानात आणि परिसरातच उभी करण्यात येत आहेत. याठिकाणी एजंटांकडून वाहनांची कागदपत्रे तपासणी व इतर कामेही सुरू असल्याचे दिसून येते. परिणामी, परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग होत असून संपूर्ण रस्ता अडवला जात आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये कार्यरत असल्याने दररोज अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र एजंटांनी उभ्या केलेल्या वाहनांमुळे अधिकाऱ्यांच्या वाहनांना आत जाण्यासाठी पुरेशी जागाच राहत नसल्याची तक्रार समोर आली आहे. अन...

रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती

Image
 रमजान काळातही स्वच्छतेकडे दुर्लक्ष; अन्न व औषधी विभागाच्या नोटिसांनंतरही विक्रेत्यांची ‘जैसे थे’ स्थिती परभणी, दि. ९ (टिळक रत्न प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असताना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने साप्ताहिक टिळक रत्न यांच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस बजावून स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या कारवाईनंतरही अनेक विक्रेत्यांच्या कामकाजात कोणताही ठोस बदल झालेला दिसून आलेला नाही. शहरातील विविध भागातील हॉटेल, नाश्ता केंद्रे व रमजान निमित्त उभारण्यात आलेल्या खाद्य स्टॉलची पाहणी केली असता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष, हातमोजे व हेडकॅपचा अभाव तसेच परिसरात अस्वच्छता आढळून आली. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या बाबीकडे संबंधित विक्रेते गांभीर्याने पाहत नसल्याचे स्पष्ट झाले. अन्न व औषधी विभागाने नोटीस देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्...

महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;

Image
महापौर सय्यद इकबाल यांचा आशा वर्करांशी संवाद;  महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा परभणी, दि. 9 (टिळक रत्न प्रतिनिधी)- : परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सय्यद इकबाल यांनी महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांची सोमवारी (दि. 9) बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आशा वर्कर महिलांना शुभेच्छा दिल्या. या बैठकीस शिवसेना जिल्हा महिला संघटक प्रमुख सौ. अंबिकाताई डहाळे, सौ. वंदना कदम आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या. आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करांनी गरोदर मातांची नियमित तपासणी, औषध व लसीकरणाबाबत जनजागृती करावी तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत उपलब्ध सुविधा घराघरांत पोहोचवाव्यात, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, घरात कचराकुंडी ठेवावी आणि घंटागाडी आल्यावर कचरा त्यात टाकावा याबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी सौ. अंबिकाताई डहाळे यांनीही आशा वर्कर महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न...

8000 रु लाच घेताना रंगेहात पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली

Image
 “गोशाळा प्रकरणात कारवाईसाठी 10 हजारांची मागणी; 8 हजार घेताना पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याला एसिबी ने केले जेरबंद” लाच घेताना पकडले आणि आरोपी पोलीस हवालदार विठ्ठल मुंढे याची तब्येत बिघडली अगदी फिल्मी स्टाईल सारखी घटना   परभणी, दि. 7 (टिळक रत्न प्रतिनिधी) : तक्रारीवर कारवाई करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धडक कारवाई गंगाखेड येथे करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी येथे ओमकार नगर, गंगाखेड येथील 70 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, ते गोशाळा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने सोनपेठ पोलीस ठाण्यात गोशाळेतून गाय व दोन वासरे जबरदस्तीने नेल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करण्यासाठी बीट जमादार व पोलीस हवालदार भगवान विठ्ठल मुंढे (वय 54) यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. लाच मागणीची पडताळणी दि. 25 फेब्रुवारी रोजी गंगाखेड-परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्...