अनेक तासापासून लाईट बंद ठेवली जात आहे विचारायचे कोणाला
तक्रार करायची कुठे? पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास महावितरणने संपर्क क्रमांक जाहीर करण्याची नागरिकांची मागणी परभणी ( टिळक रत्न प्रतिनिधी ) :- आता सध्या परभणीतील अनेक प्रभागात थोडे जरी वारे आले आणि पाऊसाचे पाणी सुरू झाले की थेट विद्युत पुरवठा खंडित होतो हे नेहमीचेच झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने परभणीतील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते. वीज खंडित झाल्यानंतर नेमकी तक्रार कुठे करावी किंवा माहिती कोणाकडून घ्यावी, हे नागरिकांना समजत नाही. अनेकदा महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन लागत नसल्याने नागरिकांचा रोष वाढतो. या पार्श्वभूमीवर, महावितरणने त्यांचे फ्युज कॉल सेंटरचे नंबर आणि इतर जबाबदार कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तातडीने सार्वजनिक करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अधिकाऱ्यांकडून वेळेवर माहिती न मिळाल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. वीज गुल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि महिलांचे अतोनात हाल होतात. विशेषतः पाणीपुरवठ्...