Posts

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका? कारवाई केवळ नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच!

Image
परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'कागदी' कारवाईचा धडाका?  कारवाई केवळ कागदावरच नावापुरतीच; मावा-गुटक्याची खुलेआम विक्री सुरूच! ​ परभणी /टिळक रत्न प्रतिनिधी:  अन्न व औषधी प्रशासनाच्या राज्य आयुक्तपदी श्री तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार केलेल्या कारवाया पाहून अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील पानपट्ट्या बंद झाल्याचे चित्र उभे केले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवर उतरून कोणतीही ठोस कारवाई केल्याचे अद्यापपर्यंत तरी दिसून आलेले नाही. प्रशासनाचा हा तथाकथित धडाका केवळ कागदावरच मर्यादित आहे की काय? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ​ सुगंधित मावा आणि गुटक्याची खुलेआम विक्री ​वास्तविक पाहता, आजही परभणी शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांत परिस्थिती 'जैसे थे' आहे. कच्च्या सुपारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित पदार्थ आणि आरोग्याला घातक असणारे तंबाखूजन्य पदार्थ मिक्स करून 'मावा' आणि 'गुटका' खुलेआम त...

परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त!

Image
परभणीत अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा केवळ 'फार्स'; भेसळ माफिया बिनधास्त! आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतरही परभणीत संथ कारवाया; सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी गांभीर्याने मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी कारवाई केल्याचे मिडीयाला सांगू नका असे देखील मिळाली माहिती सोमवारी अन्न व औषधी प्रशासनातील अधिकारी तपासणी करण्यास येणार आहेत अशा एका अफेनेच परभणीतील खिचडी सेंटर बंद ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले , यातून एक चर्चा देखील समोर आली की ह्यांना कसं काय कळाले की तपासणी होणार आहे परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी)- राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदाची धुरा धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांभाळल्यापासून विभागाला शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांच्या पदभार स्वीकारानंतर परभणी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत आत्तापर्यंत १६ ठिकाणी कारवाया करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या कारवाया केवळ ‘आम्ही काहीतरी करतोय’ हे दाखवण्यापुरत्याच म्हणजेच केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचा सूर परभणीकरांमधून उमटत आहे. जिल्ह्यात अन्नप...

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

Image
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना मुंबई, दि. १२ (टिळक रत्न प्रतिनिधी) : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गठित समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर ...

नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा

Image
परभणी जिल्हयातील नागरिकांनो, उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण १ ते १५ मे या कालावधीत स्वगणना मोहिम स्वगणनेसाठी लिंक se.census.gov.inही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय आहे परभणी, दि. १६  (टिळक रत्न प्रतिनिधी) -- भारत सरकारकडून देशाची १६ व्या जनगणनेच्या कामास सुरुवात झालेली असुन या जनगणनेमध्ये यावेळी 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व नागरिक, विशेषतः तरुण, शिक्षित बांधवांनी पुढाकार घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची माहिती स्व-गणने‌द्वारे भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. स्व-गणनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. प्रारंभी  दि. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्व-गणना मोहिमेबाबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.     *स्व-गणना म्हणजे काय ? -* आपण स्वतः आपल्या मोबा...

अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज

Image
अमृत चे वतीने परभणीत 28 व 29 मार्चला महासेल चे आयोज   वस्तु, कपडे, खाद्यपदार्थ, ज्वेलरी, कलात्मक वस्तु खरेदीची संधी परभणी, दि. 17 (टिळक रत्न प्रतीनिधी ) :  ‘ अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 28 व 29 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जागृती मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी येथे ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योजक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती साहित्य, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने एकाच ठिकाणी म...

महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड

Image
महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी शिवाजी भरोसे यांची निवड  परभणी,दि.16(टिळक रत्न प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत.          राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि सुरेशराव वरपुडकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.          दरम्यान, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी शेषराव भरोसे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला. यावेळी गटनेत्या तिरुमला खिल्लारे, मोकींद खिल्लारे, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.         दरम्यान, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत परभणी शहराच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे भरोसे यांनी सांगितले.

उद्या पासून 3 दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज

Image
 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे* मुंबई, दि. 16 मार्च (टिळक रत्न प्रतिनिधि) : दि. 17 ते 20 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 17 मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील. यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 21 मार्चपासून राज्यातील हवामान स्थिर होण्याचे संकेत आहेत. रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्या...