Posts

Showing posts from May, 2022

राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद चालू आहे की काय-एजाज देशमुख

राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद चालू आहे असेच चित्र दिसते ....!! - एजाज देशमख  औरंगाबाद (टिळक रतन प्रतिनिधी)- राष्ट्रात सध्या राज्याात वरिष्ठ  नेेत्याच्या मार्गदर्शन खाली म्हणा किंवा मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद चालू आहे की काय असेच चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे प्रवक्ते एजाज देशमुख तसेच संजय केणेकर यांनी केला. अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही प्रदेश प्रवक्ते एजाज देशमुख यांनी  दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजवणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका त्यांनी या वेळी व्यक्त केली. आघाडी सरक