बीआरएस चा परभणीत मोर्चा सम्पन्न
परभणीत भारत राष्ट्र समितीचा भव्य मोर्चा सम्पन्न केंद्रेकर यांचा अहवाल लागू करा : अन्य मागण्यांचाही समावेश परभणी,दि.22(प्रतिनिधी) : सेवानिवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तेलंगना मॉडेलवर आधारित शेतकरी आत्महत्येंच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या अहवालाची त्वरीत अंमलबजावनी करावी यासह अन्य मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीने मंगळवारी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी तेलंगाना मॉडेल लागु करा या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत राष्ट्र किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव कदम यांच्या नेतृत्वाखाली धडकला .यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर विभागातील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले .या दहा लाख शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणात सुमारे चाळीस टक्के शेतकरी नैराश्यात असल्याचे तर एक लाख शेतकरी आर्थिक ताणामुळे आत्महत्य