सारथीच्या प्रगती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पत्र
मराठा समाजातील युवकांसाठी नोकऱ्या, शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच सारथी संस्थेला बळकट करण्यासाठी अनेक निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ▪️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पत्र मुंबई दि १९ ऑगस्ट (प्रतिनिधी):- मराठा समाजाच्या समाजाच्या हितासाठी राज्य शासनाने केवळ गांभीर्याने विचारच केलेला नाही तर अनेक मुद्द्यांवर कार्यवाही देखील केली आहे. याविषयीची संपूर्ण माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली असून, अद्याप ती न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे. *राष्ट्रपती, पंतप्रधानांना विनंती* राज्य विधानमंडळाने देखील आरक्षणाची 50%इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता घटनेत योग्य ती सुधारणा करावी अशी शिफारस केंद्र सरकारला ठरावाद्वारे केली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र देण्यात आले असू