कृषी उडान योजनेत औरंगाबाद विमानतळाचा समावेश केंद्र सरकार सकारात्मक
कृषी उडान योजनेत औरंगाबाद विमानतळाचा समावेश केंद्र सरकार सकारात्मक खासदार इम्तियाज यांच्या मागणीला प्रतिसाद, केंद्रीय नागरी विमान वाहतुकमंत्री यांची माहिती औरंगाबाद (टिळक रत्न प्रतिनिधी ) :- केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे खासदार इम्तियाज जलील सदस्य आहेत. मागील आठवड्यात समितीच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याची मागणी केली. तसेच पत्र सुध्दा दिले होते. तसेच या मागणीला प्रतिसाद देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय चिकलठाणा विमानतळाचा कृषी उडान-२.० योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कळवले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ५ डिसेंबरला दिलेल्या पत्रात नमुद केले होते की, औरंगाबाद जिल्ह