स्वा वीर सावरकर टपाल तिकिट च्या किमत, म्हणजे तीच राष्ट्रभक्तांची किंमत असे कोणीही ठरवू नये - हिंदू जनजागृती समिती

 टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते हिंदु जनजागृती समिती



      स्वाविनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसच्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करतेवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्वइंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढलेमात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेतजर इंदिरा गांधी यांनी स्वासावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवलीअसे मंत्री महोदयांना म्हणायचे असेलतर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्‍यांना अधिक महत्त्व का आले आहेहे त्यातून लक्षात येतेमाननीय मंत्रीमहोदयएखाद्या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसतेयाचे भान ठेवाअसे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

     राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरवायची झालीतर गांधीजींच्या टपाल तिकिटाची किंमत दीड आणा म्हणजे पैसेमोतीलाल नेहरूजवाहरलाल नेहरूकस्तुरबा गांधी यांच्या टपाल तिकिटांची किंमत 15 पैसे आहेत्या तुलनेत स्वासावरकरांच्या टपाल तिकिटांची किंमत 20 पैसे आहेयातून स्वासावरकर यांची किंमत तत्कालीन काँग्रेसी नेत्यांपेक्षा अधिकच आहेस्वासावरकरांची तुलना माकडाशी करणार्‍या उर्जामंत्र्यांनी एकप्रकारे गांधी-नेहरूंच्या तिकिटांचीही तुलना माकडाशी केली आहेहे त्यांच्या लक्षात येत आहे का देशासाठी फार काही जमत नसेलतर किमान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या थोर क्रांतीकारकांचा आदर राखण्याएवढे सौजन्य तरी काँग्रेसी नेत्यांमध्ये असले पाहिजेब्रिटिश सत्तेविरुद्ध ठाम राहून स्वासावरकर अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी गेलेमात्र येथे मंत्री महोदय स्वतःच्या फेसबुक पोस्टविषयीही ठाम रहाण्याचे धाडस दाखवत नाहीतत्यामुळेच त्यांनी ती पोस्ट लगेच डिलीट करून पळ काढलामग कोण पळपुटे निघाले ?, असा प्रश्‍नही हिंदु जनजागृती समितीने केला आहे.


Comments

Popular posts from this blog

परभणीत तहसीलदाराच्या बंगल्यातून ऐसीबी ने साडे नऊ लाख जप्त सोबत बिल्डिंग घेतली ताब्यात 

बाल विद्या मंदिर शाळेचा मुख्यधापक व लिपिक लाच घेताना अटकेत

परभणीत गुरुवारी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्यचे आयोजन