पोलिसांच्या कारवाईमुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास-पोलीस कारवाईचे सर्वस्तरातून झाले कौतुक
परभणी(प्रतिनिधी):- परभणीतील वर्दळीच्या ठिकाणी हातगाडीवाल्यानी ठीक ठीकानी रस्ते अडवून आपले व्यवसाय थाटले आहेत यामुले शहरातील वाहतूक कोंडी होत होती अनेकवेळा याविषयी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या पण कारवाई पुरते गाडीवाले गायब होत होते व पोलीस गेले की परत रस्त्यावर येत असत यात मनपा केवळ बघ्याची भूमिका बजावत आली आहे .आज परभणीत पोलिसानी परत एकदा कारवाई केल्याने रस्त्यानि मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आज आर आर टॉवर परिसर,अष्टभुजा मंदिर परिसर,गांधी पार्क,गुजरी बाजार,आदी भागातील रस्ते हातगाडीमुक्त दिसून आले, पोलिसांनि केलेल्या करवाईवर सर्वस्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे यात आता मनपाने नेहमी प्रमाणे केवळ बघ्याची भूमिका न घेता इतर अतिक्रमण देखील तात्काळ दूर करून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यास पोलीस प्रशासनच्या हातात हात मिसळून कार्य करावे नागरिकांना वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी हीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत
Comments
Post a Comment