राज्यातील प्रत्येक उद्योगामध्ये 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिलाच पाहिजे
मुंबई :- राज्यातील उद्योगांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबत कायदा असून त्याची सर्व उद्योगांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
पण याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नाहीये स्थानिकांना रोजगार का मिळत नाहीयेत व त्यांना स्वतःचे गाव सोडून दुसऱ्या गावात रोजगार प्राप्तीसाठी जाण्याची वेळ का येते याकडे पण लक्ष देणे आवश्यक झाले आहे. दरम्यान जे उद्योग या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्याच्या सूचना उद्योग संचालनालयास देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment