Posts

Showing posts from October, 2025

तेल काढणी युनिट अनुदान तत्त्वावर हवे असेल तर त्वरित अर्ज करा

Image
तेल काढणी युनिटसाठी अर्ज करण्याचे आवाहन परभणी दि. 30 (टिळक रत्नप्रतिनिधी) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अभियान सन 2025-26 अभियान अंतर्गत जिल्ह्यात अनुदानावर 1 तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री, उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) साठी लक्षांक प्राप्त असुन प्रत्यक्ष खर्चाच्या 33 टक्के किंवा 9.90 लाख अनुदान देण्यात येणार असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी तेल काढणी युनिटसाठी  7 नोव्हेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज करण्यात यावेत. तसेच सदर बाबीअंतर्गत परभणी जिल्ह्याकरीता 1 भौतिक लक्षांक असल्यामुळे 1 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडतीव्दारे निवड करण्यात येईल. सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था, सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असुन सरकारी/ खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी (एफपीओएस) व सहकारी संस्था यांनी बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर संबंधि...

तंबाखूमुक्त युवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणे गरजेचे - जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण

Image
परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबवावे -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी, दि. 29 (टिळक रत्न प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, परभणी) संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक बुधवारी (दि.29) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभागांमार्फत कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करून परभणी जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. परभणी जिल्ह्यात तंबाखु मुक्त युवा अभियान प्रभावीपणे राबविण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी केली. बैठकीस महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा शल्यचिकित्सक व सदस्य सचिव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक आणि विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभाग व तंबाखू नियंत्रण कक्षाला दिले. तसेच सर्व सरकारी क...

परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडत संतप्त शेतकऱ्याने केला रोष व्यक्त

Image
परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडत संतप्त शेतकऱ्याने केला रोष व्यक्त परभणी (टिळक रत्न प्रतिनिधी): अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत मिळाली नाही, तसेच सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात असल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) दुपारी घडली.      संतोष रावण पैके (रा. चाटोरी, ता. पालम) असे या संतप्त शेतकऱ्याचे नाव आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्याने शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो एकरांवरील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत.      शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिवाळी सण काळातही अनेकांनी “काळी दिवाळी” साजरी केली. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत गाडी फोडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैके यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने प्रशासनात ए...

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

Image
महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत नामफलक शिवसेनेच्या तीव्र आक्षेपानंतर तात्काळ हटविला परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील स्मशान भूमी जवळील घटना परभणी,दि.27(टिळक रत्न प्रतिनिधी) :  राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या वसमत रस्त्यावरील एका चौकात काही व्यक्तींनी अचानक अनाधिकृतपणे लावलेल्या नामफलकावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर महापालिका प्रशासनाने तो नामफलक हटविला.            गेल्या काही महिन्यांपासून काही व्यक्ती किंवा संस्थांकडून परस्परच पाट्या लावून शहरातील चौकांचे, रस्त्याचे नामकरण करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. असाच एक प्रकार वसमत रस्त्यावर स्मशानभूमीजवळ अलि कॉर्नर नावाचा एक नामफलक काही व्यक्तींनी रातोरात झळकवला. सोमवारी तो प्रकार निदर्शनास आल्याबरोबर शिवसेनेच्या संतप्त पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी त्या अनाधिकृत फलकावर तीव्र आक्षेप नोंदविला व महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे धाव घेतली.  स्मशानभूमी परिसरातील वसमत रस्त्यावरील अली कॉर्नर हा फलक पूर्णपणे अनधिकृत असल्याचे नमूद करत, त्याविरुद्ध ...

राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

Image
 राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर परभणी दि 13 ऑक्टोंबर ( टिळक रत्न प्रतिनिधी) : - राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत आज 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली राज्यात जिल्हा न्याय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले खालील यादीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षण कोणाला जाहीर झाले याची माहिती पुढील प्रमाणे 1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)2. पालघर – अनुसुसूचित जमाती3. रायगड- सर्वसाधारण4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण6. नाशिक -सर्वसाधारण7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)8. नंदूरबार-अनुसूचित जमाती9. जळगांव – सर्वसाधारण10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)11. पुणे -सर्वसाधारण12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)13. सांगली – सर्वसाधारण (महिला)14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)18. बीड – अनुसूचित जाती (महिला)19. हिंगोली -अनुसूचित जाती20. नांदेड –...

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Image
 15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि 12 ऑक्टोबर (टिळक रत्न प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.  शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

अनुकंपा धारकांकरिता नोकरी विषयक राज्य शासनाच्या वतीने खुशखबर

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार ,अनुकंपाचा अनुशेष संपणार! 4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यातील 5187 अनुकंपा उमेदवारांना मुंबई, 1 ऑक्टोबर (टिळक रत्न प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आण...