नवीन नळ कनेक्शन साठी मनपा आपल्या दारी उपक्रम - मनपाने जुन्या सर्व नळ धारक यांना मनपा वतीने थेट जोडनी द्यावी नागरिकांची अपेक्षा
जून्या जलवाहिन्या हळू हळू करण्यात येणार
आयुक्त देविदास पवार यांची माहितीः नवीन कनेक्शनसाठी मनपा आपल्या दारी उपक्रम
जुन्या नळधारकाना मनपाने स्वतःहून जोडणी द्यावी व त्यांचेकडून जोडणी झाल्यावर पैसे वसूल करावेत
परभणी, दि.8(प्रतिनिधी)- महानगरपालिकेतंर्गत युआयडीसी व अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसह जलवाहिन्या अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून आता नवीन जलवाहिन्यांद्वारेच, नवीन कनेक्शनद्वारेच शहरवासियांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. हळूहळू जुन्या जलवाहिन्या वापरासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली.
कोरोना काळात नागरिकांकडून अशी मागणी होत आहे की जुने नळ कनेक्शन ज्यांचे कडे आहेत व ज्यांनी वेळेवर नळ पट्टी व घरपट्टी नियमित भरली आहे व भरतात अशांना मनपा ने स्वतः जोडणी द्यावी व त्याचे लागलेले खर्च नळधारकाकडून नन्तर वसूल करावा अशाने सर्व नळ जोडण्या त्वरित पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे
Agdi barobar aahe me ghar patti ani nalpatti cha bhavna kela aahe tari hindi karawi
ReplyDelete