हिंदू जनजागृती समितीचे मानवत येथे कोरोना संदर्भात नागरिकांचे प्रबोधन



मानवत (परभणी) येथे हिंदू जणजागृती समितीच्या वतीने नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले
22 मार्च जनता करफीयुला समस्त नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन
मानवत (प्रतिनिधी):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की कोविद-19 (कोरोना-19) विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी 22 मार्च रोजी सकाळी 7 रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यु चे आवाहन केले आहे पंतप्रधान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगभरात पहिल्यांदाच नागरिकांनी राष्ट्र हितासाठी स्वतःहून लावून घेतलेला बंद असेल या उपक्रमात सहभागी होणे हे सर्व नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे कोरोनाच्या संकटकाळी हिंदू जन जागृती समितीही या उपक्रमात सहभागी आहे 21 मार्च रोजी सर्वत्र देशव्यापी प्रबोधन करण्यात आले मानवत येथे भाजी मंडई परिसर बस स्थानक परिसर मध्ये कार्यकर्ते हातात प्रबोधणं फलक घेऊन उभारले होते यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी देखील सहभाग नोंदवला 
सर्वांनी सॅनिटाईजर व मास्कचा वेळोवेळी वापर करावा,
यात नागरिकांनी कोरोना 19 च्या विरोधात लढण्यासाठी समबंधीत खात्याने सांगितल्या प्रमाणे  सर्व सूचनांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे, 22 मार्च ला नको खरेदी नको प्रवास घरी राहुन करूयात आरोग्याचे रक्षण खास,
एक दिवस देशाच्या आरोग्यासाठी सर्वांनी मिळून या महामारी सारख्या आजाराला संघटिपणे लढा देऊन देशातून घालवून लावूया, अश्या प्रकारचे माहिती सांगणारे फलक द्वारे नागरी प्रबोधन करण्यात आले .

Comments

Popular posts from this blog

अली कॉर्नर नावाचा फलक शिवसेनेच्या आंदोलन नंतर मनपाने हटवला

सारंग स्वामी विद्यालय 2005 दहावी वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

15 ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज